Monday, March 25, 2024

 “घडिघडी करावा विवेक देहादि प्रपंच मायिकसत्य नित्य शाश्र्वत एक असे   नि:शंक आत्मरूप”


“स्वरूप पत्र मंजुषा” या स्वामींनी साधकांनां लिहिलेल्या पत्र संग्रहांतींल क्र. ६३-६४-६५ ही तीन पत्रे व स्वामींचे संजीवनी गाथेतील अभंग  सोsहं साधने च्या दृष्टीने फार उपयुक्त व मार्गदर्शक आहेत.तीनही पत्रांत साक्षित्व शब्द आहे

यांतून स्वामी  विवेक युक्त वैराग्या ची गुरूकिल्लीच साधकांच्या हाती देतात. 


 “घडिघडी करावा विवेक देहादि प्रपंच मायिकसत्य नित्य शाश्र्वत एक असे नि:शंक आत्मरूप”॥स्वपमं.६३/२


आत्म-रूप कसं?ते नि:संदेह सत्य नित्य शाश्र्वत एकमेवाद्वितीय आहे. तर  देहादि प्रपंच मायिक म्हटलं आहे.

मायिक म्हणजे जी सत् नाही असत् ही नाही पण दिसते, भासते व व्यावहारिक सत्तेत आहे अशी प्रातिभासिक नाशिवंत


आता विवेक युक्त वैराग्या चा विचार करु. स्वामींनी लिहिले आहे वैराग्याचा अभ्यास सुखें करावा. विरोधात्मक अशा वाटणाऱ्या या विधानाची खूण ही लगेच सांगतांनां ते लिहितात देहांत गुंतू  नये


प्रपंचीं असावें उदास वर्तन । आवरावें मन विवेकाने ॥१॥ सुखें वैराग्याचा करावा अभ्यास। प्रपंचाचा त्रास मानूं नये ॥३॥स्वामी म्हणे देही जाई गुंतून ।ही चि असे खूणवैराग्याची ॥४॥” मायिकाची आसक्ती सोडा हा मुद्दा स्वामी वारंवार समजावतात “अंतरीं संतत करीं सोsहं ध्यान।न जाईं गुंतून संसारांत॥१ ॥धन सुत दारा असूं दे पसारा।नको देऊं थारा आसक्तीतें॥२॥होवो हानि- लाभ पावो सुख-दु:ख।न सोडी विवेक साक्षित्वाचा ॥३॥स्वामी म्हणे राहें देहीं उदासीन। पाहें रात्रं-दिन आत्म-रूप ॥४॥ “अंतरीं  जागृत ठेवावा विवेक । लक्षूनियां एक आत्म-रूप” ॥संजीवनी गाथा २०३,१५०,१६४/२॥

सांप्रदायिक अनुग्रह लाभलेल्या साधकांनां स्वामी सांगतात :-

“तुजलागीं संप्रदायें करोन ।समंत्र सांगितलें सहज-साधन ।नित्यनेमें आसनीं बैसोन करावें चिंतन स्वरूपाचें

॥१॥  स्व-रूप चिन्मय आनंदघन। आपणहि तैसेचि परिपूर्ण।ऐसें भावितां तन्मय होवोन मनासी मनपण उरे कोठें ?॥२॥उरे कोठें द्वैत-स्थिति।देह-गेह-

जगत्-भ्रांति।क्षणैक अद्वयानंदानुभूति। देतसे शांति साधकाासी॥३॥ साधकासी पुनरपि भव-प्रत्यय।होतां नाना वृत्तींचा उदयसोsहं-स्मरणें धरावी सोय नित्यानित्य-विवेकाची॥४

विवेकाचा घेवोनि आधार साक्षित्वें करावे सर्वहि व्यापार।सुख-दु:खे प्रारब्धानुसार भोगावी साचार यथाप्राप्त॥५॥ प्राप्तकर्माचरणीं निपुण। भक्ति-ज्ञानें सुसंपन्न ।अखंड करी सोsहं-ध्यान ।कृतार्थ जीवन होय त्याचे”॥६॥स्व.प.मं. ६५॥ या पत्रात

स्वामी नित्यानित्य विवेक सांगत आहेत.


जीव,जगत्,ईश्र्वर व अनिर्वचनीय ब्रह्म यांचा अन्योन्य संबंध समजून आपणही आत्मानात्म, सत्यासत्य, नित्यानित्य, विवेक करून होळीपौर्णिमेच्या पर्वी लेखाची सांगता मानस होळीने करूंया 

         

        संत जनाबाई यांची

        ।। मानसहोळी ।।

 कराया साजरा । होलिकेचा सण । मनाचे स्थान । निवडीले ।।ऐसे ते स्थान । साधने सारविलेभक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।। रचलीया तेथे। लाकडे वासनांचीइंद्रीयगोवऱ्यांची। रास भली ।। गुरुकृपा तैलरामनाम घृत ।अर्पिले तयात । ऐसे केले ।। रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी ।भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले । यज्ञरूप आले । झाली कृपा ।।दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती ।आणिक पुर्णाहूतीषड्रिपु श्रीफळ।।झाले सर्व हुतवैराग्य अग्नीत । जाणावया तेथ । नूरले काही ।। वाळ्या म्हणे जनी । व्हावी ऐसी होळी ।।जेणे मुक्तीची दिवाळी।    अखंडित ।। 


सोsहं-हंसावतार चैतन्यरूप स्वामी स्वरूपानंद यांचे चरणी ही शब्दसुमनें    

             सर्वभावे समर्पण

               माधव रानडे


    होळीपौर्णिमेच्या शुभेच्छा! 🎉🎊❤🧡💛💚💙💜🖤🤍








Friday, March 15, 2024

            “ या देहाची हे दशा । आणि आत्मा 

                तो एथ ऐसा ।”


“ज्ञानेश्र्वरी-नित्यपाठ” या स्वामींच्या  “भावार्थ-दीपिका” गीता-तत्वाचं सार, मर्म म्हणून सकृतदर्शनी एकमेंका विरोधी वाटणाऱ्या अध्याय १३ मधील ओव्या स्वामींनी केंद्रबिंदु, महत्वाचा मुख्य विषय म्हणून निवडल्या.


क्र.५७ नंतरच्या ओव्या वाचताच लक्षात येतं की पंचमहाभूत संघातातून प्रकृतीच्या संयोगाने झालेले सर्व देह नाशिवंत आहेत पण देह वेष्टणात असलेलं आत्म-तत्व, शाश्र्वत, अमर अविनाशी, अज, नित्य, सर्वत्र, सदैव, समान निराकार व निर्गुण आहे.


आत्मा निर्गुण असल्याने देह आवरणांत असूनही कर्मबंधांनी लिप्त होत नाही.


“आपुले मरण पाहिले म्या डोळां- -”

अशा आत्म-साक्षात्कार, आत्मज्ञानाच्या अनुपम्य सोहाळ्या नंतर ईश्र्वर प्रणीत आपले विहीत कर्म काय याची स्पष्ट जाणीव होऊन त्यांच्या नव जीवनाची वाटचाल निश्र्चित करण्यासाठी त्यांनी मा जगदंबेचा कौल घेऊन ठरवले कीं- 


“सत्याचें दर्शन घडावे संपूर्ण।ध्येय हें लक्षून जीवनाचें॥१॥प्रेम-अहिंसेचे घवोनियां व्रत।लोक-सेवा-रत राहे सदा”॥२॥संजीवनी गाथा ६२॥


ध्येयाशी मनाने तन्मय स्वामी लिहितात-

“तन्मय होतां कुठली बोली ती द्वैताद्वैताचीस्वानुभवाविण कोण जाणता स्व-संवेद्यता त्याची”॥अमृत धारा६८॥


ज्याच्या अधिष्ठानावर देहाचे व्यापर चालतात, त्या द्वैताद्वैतातीत, आत्म- तत्वाचा अपरोक्ष अनुभव घेऊन स्वामींनी या प्रवासातील बारकावे, खाणाखुणा साहित्य रूपी वाटाड्या म्हणून आपल्या हाती दिले आहेत. 


देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्यासाठी स्वामींनी सोsहं साधना सांगितली-

“असे सहज परी सोsहं भावे करी सतत अभ्यास।हीच साधना जोंवरीं न तो झाला मोह-निरास”॥अमृधारा२५॥


आणि मी म्हणजे देह ही भ्रामक कल्पना दूर करायला स्वामी सांगतात - 


“ ‘मी मी’ म्हणसी परी जाणसी काय खरा ‘मी’ कोण  असे ‘काय’ ‘मी’ ‘मन’ ‘बुद्धी’ वा ‘प्राण’ ? पहा निरखोन । ‘प्राण’ बुद्धी मन काया माझी परि मी त्यांचा नाही । तीं ही नव्हती माझी कैसें लीला-कौतुक पाही !॥ गूढ न कांहीं येथ सर्वथा अर्थ उघड वाक्याचा  । जाण चराचरिं भरुनि राहिलों मीच एकला साचा”॥अ.धारा ११२ ते ११४॥


शेवटच्या साकींत  वाक्याचा शब्दानें 

 स्वामी महावाक्याचा निर्देश करतात ज्या महावाक्याचा निर्देश करतात, ते तत् त्वम् असिमहावाक्य 

श्रुतिवचनांतील चार महावाक्यांपैकी एक आहे. हे छांदोग्य उपनिषदांत आहे. यात पिता आरूणि त्याचा पुत्र श्वेतकेतु

ला सांगतो तूं स्वत:च(परमात्मा) आहेस

आपली उपनिषदें सत्य किंवा रूपक बोधकथांतून स्वामीं सारख्या सत्या- न्वेषकांना व विचारवंतांनां मार्गदर्शन करतात. मूलभूत चिंतन करणारे दोन उपनिषदातील एक श्रुतिवचन असे आहे

नायमात्मा प्रवचनेन लभ्य: न मेधया न बहुना श्रुतेन । यमेवैष वृणुते तेन लभ्य: तष्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम”॥ कठोपनिषद (१/२/२३) मुंडक (३/२/३). थोडक्यात, एऱ्हवी असाध्य स्वयंप्रकाशी हा आत्मा जो सहस्पंदित होत त्याचा शोघ घेतो त्याची निवड स्वत: करतो.

“निधान सन्निध परि घोर तमीं इत स्तत: भ्रमलो मी ज्ञान-किरण-दर्शनें आतां सत्प्रकाश अन्तर्यामीं”॥अ.धारा १००॥ इथे लक्षात ठेवलं पाहिजे कीं सोsहंसूत्र, मूळ चा ज्ञानमय, प्रकाशमय किरण आहे व या परब्रह्माची ‘सोsहंही प्रकृती आहे 

अन्वय दृष्टीने विश्र्वाकडे पहाणाऱ्या 

स्वामींना सर्व दृश्य वस्तूंत परमात्माच दिसे म्हणून ते नि:शंक पणे लिहितात-

“पडे त्यासी पडो विश्र्वाचें हें कोडें । आम्हासी उघडें आत्म-रूप ॥१॥ जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं संपूर्ण । आत्म- रूप जाण प्रकटलें ॥३॥आत्मरूप दृष्टि आत्म-रूप सृष्टि आत्मा पाठीं- पोटीं स्वामी म्हणे ”॥४॥ किंवा “आत्म-रूप आतां आघवा संसार। ठेली येरझार एकसरां॥२॥पावलो नैष्कर्म्य देहीं विदेहत्व । डोळां परतत्व देखियेलें”॥३॥संजीवनी गाथा ७४ व २०॥असे हे आत्म-रूपा चे पारणे इतक्या सोप्या शब्दांत सोsहं-हंसारूढ चैतन्य रूप स्वरूपानंद गुरू माऊलींनी सर्व भक्तांसाठी दिले आहे. त्यांच्याच चरण कमली अर्पण करून नैवेद्य म्हणून घेऊ.

माधव रानडे